अतिक्रमण विरोधात पत्रकाराचे झाडावर चढुन आंदोलन
पोलीस कर्मचारी यांच्या सतर्कते मुळे अनर्थ टळला
उदगीर(संगम पटवारी) शहरतील छञपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयापर्यंतच्या मुख्य रस्त्यावरील शंभर फुटाआतील अतिक्रमण काढूण रस्ता व नालीचे काम करण्यात यावे यासाठी जुन महिण्यात २९ दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते २९ व्या दिवशी सार्वजणीक बांधकामविभागाच्या वतीने आंदोलक पञकारांना १४ ऑगस्ट पर्यंत अतिक्रमण काढू असे लेखी पञ देण्यात आले होते माञ १४ ऑगस्ट हा दिवस निघून गेला तरी अतिक्रमण काढण्यात आल नाहि
म्हणुन १४ऑगस्ट २०२२ पासुन पासुन पुन्हा दुसर्या टप्यातील बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले असुन आज १२ व्या दिवशी सार्वजणीक बांधकाम उपविभागीय अभियंता कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन व झाडावर चढून आंदोलन सुरु केले आहे जो पर्यंत अतिक्रमण निघणार नाही तो पर्यंत हे बेमुदत धरणे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा आंदोलक पञकारांनी सांगितले आहे.