खंडपीठाकडून आ.कराडांच्या बेहिशेबी मालमत्तेची; ईडीला नोटीस
प्रतिनिधी | औरंगाबाद खंडपीठाकडून आ.कराडांच्या बेहिशेबी मालमत्तेची; ईडीला नोटीस बजावण्याचे आदेश दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन त्यामुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुनावणीत २० सप्टेंबर २०२२ पर्यंत कराड कुटुंबीयांच्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगण्यात येत आहे.
यांच्या बेहिशेबी मालमत्तेसंबंधी विनायक श्रीपती कराड यांनी सक्तवसुली संचलनालय दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र कारवाई झाली नाही.याबाबत कराड कुटुंबीय भाजपचे असल्याने त्यांच्याविरुद्ध ईडी कारवाई करत नसल्याचा आरोप अर्जदाराने केला असल्याचे समोर आले आहे.आता 20सप्टेंबर रोजी मालमत्ते संदर्भात कोणती कागदपत्रे दाखल होणार हे आता वेळच ठरवरणार आहे.