Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वंजारी महासंघ महाराष्ट्रच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्काराने अंबाजोगाई येथील सुनिल सिरसाट सन्मानित

वंजारी महासंघ महाराष्ट्रच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्काराने अंबाजोगाई येथील सुनिल सिरसाट सन्मानित

*अंबाजोगाई/प्रतिनिधी*



दिनांक २५/१२/२२ रोजी नाशिक येथे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे पहिले एकदिवसीय साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनात राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात साहित्य-कला आविष्कारातील राज्यस्तरीय पुरस्काराने अंबाजोगाई येथील पत्रकार सुनिल सिरसाट यांना सन्मानित करण्यात आले.
    महाविद्यालयीन जीवनात ईतर विषयांसह नाट्यशास्त्र विषय घेऊन पदवी घेतलेल्या सुनिल सिरसाट यांनी स्थानिक पातळीवर, विद्यापीठ स्तरावर आणि राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने अनेक नाटकांत काम केलेले आहे. शिवाय ते गेल्या २५-२६ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून काम करत असताना अंबाजोगाई तालुका स्तरावर भाजयुमो चे पदाधिकारीही राहिलेले आहेत. उत्तम संभाषण कौशल्य आणि रोखठोक स्वभावाचे निर्भीड वक्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे.
तर विशेष म्हणजे गेल्या १९ वर्षांपासून ते पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत आहेत. निर्भीड मांडणी आणि रोखठोक लेखणीतून त्यांनी समाजातील सर्व स्तरातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रखर लिखाण केलेले आहे. एकंदरीत त्यांचा या सर्व बाबींचा विचार करूनच वंजारी महासंघाने आपल्या पहिल्याच साहित्य संमेलनात राज्यातील पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित केले आहे.

*जीवनातील पहिल्या पुरस्काराने जबाबदारी आणखीनच वाढली*

आज जीवनातील पहिला राज्यस्तरीय पुरस्कार पत्रकारिता क्षेत्रात मिळाला असून यामुळे भविष्यात आणखीनच लिखाणाची जबाबदारी वाढली असुन या क्षेत्रानेच मला समाजमनात ऐक वेगळी ओळख निर्माण करून दिली असल्यामुळे या क्षेत्राचे मी अगदी मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली.
        यावेळी व्यासपीठावर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वंजारी समाजाचे प्रत्येक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. तर या साहित्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले तेलंगणा राज्यातून आलेले समाज प्रतिनिधी आणि त्यांनी हिंदी व आपल्या मायबोली भाषेतून कर्मयोगी संतश्रेष्ठ ह.भ.प.संतभगवानबाबा व लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावाने दिलेल्या घोषणा.....! या घोषणांनी जरीकरता सभागृह दणाणून गेले असले तरी मुंडे साहेबांच्या आठवणीने काही वेळासाठी सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाल्याने एकुण दिवसभराच्या कार्यक्रमात ही भावनिकताही चर्चेचा विषय ठरल्याचे आणि मुंडे साहेबांच्या उणीवेचे पडसाद प्रकर्षाने जाणवल्याचे चित्र दिसून आले.....!!.
Previous Post Next Post