गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
दहशदवाद्यांचा घातपाती कारवायांचा कट एटीएसने उधळून लावला;देशात हाय अलर्ट जारी
![]() |
दहशतवादी |
मुंबई : दहशतवादी संघटना अल सुफा आणि आयसिसशी संबंधित अनेकांना एनआयए आणि एटीएसने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातून अटक केली आहे. दहशदवाद्यांना अटक झाल्यानंतर एटीएसने अनेक खुलासे केले आहेत. या दहशतवाद्यांची बॉम्ब बनवणारी लॅब असल्याची माहिती समोर आली आहे. एटीएसने दहशदवाद्यांचा घातपाती कारवायांचा कट उधळून लावला आहे. महाराष्ट्र एटीएसने या दहशवाद्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा १५ ऑगस्टला देशात अतेरिकी कारवायांचा मोठा प्लॅन असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. मोहम्मद युनूस साकी, मोहम्मद इम्रान युनूस खान, झुल्फिकार बरोडावाला, शाहनवाज आलम अशी या दहशदवाद्यांची नावे आहेत.
महाराष्ट्र एटीएस आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून १५ ऑगस्टला घातपात घडवण्याचा प्रयत्न होता. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारतातील अनेक महत्वाची ठिकाणे होती. आयएसएस मॉड्यूलशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून झुल्फिकार अली बरोडावाला याला अटक करण्यात आली आहे. त्याने ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे फ्लॅट भाड्याने घेतला होता का, याचा तपास सध्या सुरु आहे. तसेच त्याचा फ्लॅट भाड्याने घेण्याचा हेतू काय होता, याचाही तपास एटीएस करत आहे.
आयएसएस आणि अल सुफा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित राज्यभरातून पाच जणांना अटक केली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुण्याजवळ दहशतवाद्यांनी ट्रेनिंग केले. निपाणी, संकेश्वरमध्ये मुक्काम केला. आंबोलीमध्ये बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण सुरु असल्याचे समोर आले होते. अल-सुफा ही दहशतवादी संघटना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात स्थापन झाली होती. राजस्थानच्या तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले. एक दशकापूर्वी अल सुफा संघटना प्रकाशात आल्यानंतर सरकारने बंदी घातली होती.
देशात हाय अलर्ट जारी
गुप्तचर यंत्रणांनी मुंबई, दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. भारतात मोठा विध्वंसक हल्ला घडवण्यासाठी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यावरून हाय अलर्ट देण्यात आला आहे.